aappansare.in

Social

महिलांनो सुरक्षासाठी महाराष्ट्र पोलिसांचा 112 क्रमांकाचा वापर कायम करा -प्रा. डॉ. जयपाल पाटील

Share

शहापूर -इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला तालुक्याच्या गावाला जाणार, कधी -कधी बाजाराला आणि आपल्या शेतामधील भाजीपाला कोंबडे, अंडी विकावयास जाणार तेव्हा येता जाता आपल्या सुरक्षेला पुरुष व मुलांमुळे बाधा येईल अशावेळी आपल्या हातामधील मोबाईल वरून महाराष्ट्र पोलिसांचा 112 क्रमांकाचा वापर तुम्ही करा आणि आपल्या मैत्रिणींना ही माहिती द्या असे श्रीमती एस. एस. देशमुख आणि किल्ले माऊली ज्युनिअर कॉलेज पिवळी तालुका शहापूर जिल्हा ठाणे यांनी आयोजित केलेल्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ.जयपाल पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात सांगितले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे श्री अशोक जगे संस्थेचे चेअरमन मधुकर देशमुख शाळेचे माजी विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट श्री पंकज गोधडे संस्थेचे सचिव अनिल देशमुख शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्रीयुत विष्णू धामणे, सामाजिक कार्यकर्ते सोनवणे हे उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या मुलींनी इस स्तवन व स्वागत गीत गाईले त्यानंतर प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी संविधान वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. अपघात व साप विंचू दंश आणि आपल्या घरातील लग्न झालेल्या मुलींना बाळंतपणासाठी 108 रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा यासाठी श्री निलेश घोडविंदे यांना संपर्क साधतात वीस मिनिटांनी शहापूर येथून डॉक्टर जितेंद्र पडळकर पायलट श्री अमोल बांगर त्यांचे सहकारी भोईर हे उपस्थित होऊन डॉक्टर जितेंद्र पडळकर यांनी 108 रुग्णवाहिकेची माहिती तिच्यापासून होणारे फायदे सांगून मुला मुलींनी आपल्या गावामध्ये समाजसेवेसाठी वापर करावा असे सांगितले.

यानंतर प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी 112 क्रमांक डायल करतात 25 मिनिटांनी पोलीस ठाणे वासिंद येथून पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बर्वे त्यांचे रायटर श्री एस एन धरणे आणि 112 च्या महिला पोलीस शिपाई सुविधा घरत आणि व्ही. एम. गंजाळे त्यांच्या जवळील दंडाची मशीन घेऊन उपस्थित झाल्या. यावेळी महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस कसे तत्पर आहेत याची संपूर्ण माहिती देऊन दहावी व बारावीच्या मुलींनी पुढे पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करावी असे मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी चार्ट अकाउंटंट श्री पंकज गोधडे, यांनी आपला शाळेचा अनुभव, आपल्या जीवनाची प्रगती, शाळा येथे सुरू केल्याबद्दल मधुकर देशमुख यांचे अभिनंदन केले. प्रमुख पाहुणे श्री अशोक जगे, यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिक्षण घेऊन आपण कोण होणार हे मनामध्ये ठरविले पाहिजे आणि आपल्या शाळेचे गावाचे नाव उज्वल केले पाहिजे.

समाजसेवक सोनवणे, संस्थेचे अध्यक्ष मधुकर देशमुख, यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली. शेवटी प्रा. जयपाल पाटील यांनी शासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाची कायद्याची माहिती, घरातील गॅस फ्रिज इलेक्ट्रिकल वस्तू पासून घेण्याची काळजी, शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे विमा योजनेची माहिती, बाळंतपणासाठी शासकीय रुग्णालयात नेण्या आणण्यासाठी 102 रुग्णवाहिकेचा वापराबद्दल माहिती दिली, रुग्णांना डोंगर माथ्यावरून कसे आणावयाचे याचे प्रात्यक्षिक डॉ.जयपाल पाटील यांनी यावेळी दाखविले. शाळेच्या ३५० विद्यार्थी १2 शिक्षकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय बोरुडे, आपत्ती सुरक्षा मित्र विकास रणपिसे, ओंकार देशमुख व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up